राज्यात आचारसंहिता लागू , ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – निवडणूक आयोगाने राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची तारीख घोषित केली आहे. या सोबतच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. कलम ३२४ नुसार आता प्रत्येक पक्षाला आणि निवडणुकीतील उमेदवाराला काही नियमांचे बंधन असणार आहे. प्रत्येकाला आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. नेमके आचारसंहितेत कोणत्या नियमांचं पालन करावं लागत याची माहिती आपण घेणार आहोत.

आचारसंहितेत करावे लागेल या नियमांचे पालन –

1) मतदारांना आमिष देणं किंवा धमकावणं, हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरू शकतं.

2) राजकीय धोरणावर टीका करण्याची मुभा असते. पण मतं मिळवण्यासाठी ते एकमेकांची जात किंवा धर्म काढू शकत नाहीत.

3) आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना किंवा सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत. त्यासाठी निधी जाहीर करता येत नाही.

4) पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग ठरतं. सरकारी माध्यमांचा वापर करून पक्षाची जाहिरात करता येत नाही.

5) मतदान केंद्रात कर्मचारी, अधिकारी आणि मतदारांव्यतिरिक्त कुणालाच जाण्याची परवानगी नसते.

6) बैठका किंवा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक असतं.

7) एखाद्या सभेत विरोधकांचा पुतळा जाळणं, हेही नियमात बसत नाही.

8) शेवटच्या ४८ तासांदरम्यान प्रचारावर प्रतिबंध- निवडणूक संपण्याची वेळ निश्चित झाल्यापासून त्याआधीच्या ४८ तासांच्या दरम्यान कोणत्याही मार्गाने व कोणत्याही प्रकारे निवडणुकीविषयी कार्यवाही करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, कलम १२५ अंतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे.

9) मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत.

10) जर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते.

11) आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी आचारसंहितेच्या नियमांना बांधील राहणे गरजेचे आहे.

Visit – policenama.com