IPL 2020 : ‘या’ फलंदाजाची विकेट मिळाल्यानं झाला टीमला फायदा, ट्रेंट बोल्टनं सांगितलं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्सने 5 विकेटने सामना जिंकला आहे. सामना जिंकल्यानंतर मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट म्हणाला की, आमच्यासाठी हा चांगला विजय आहे. आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि त्यांना कमी स्कोअरवर रोखले ज्यांचा आम्ही चांगला पाठलाग केला.

बोल्ट पुढे म्हणाला की, विराट आणि डिव्हिलियर्सला गोलंदाजी करणे चांगले होते. दोन्ही फलंदाजांची मोठी विकेट्स आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांना आउट करणे गरजेचे होते ज्याचा आम्हाला शेवटी फायदा झाला. पण तरीही त्यांनी चांगले लक्ष्य ठेवले होते.

या विजयामुळे आमची टीम खूप आनंदित आहे. आम्हाला जिंकून छान वाटत आहे. मोठे स्पर्धा येत आहेत पण म्हणूनच आम्ही येथे आहोत. या सामन्यात बोल्टला एकच विकेट मिळाला आणि त्याने त्याच्या चार ओव्हर्समध्ये 40 धावा केल्या. परंतु असे असूनही मुंबई संघाने आरसीबीवर विजय मिळविला.