…म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी थकले ! उद्धव ठाकरेंची आघाडीवर टीका
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आता थकले आहेत, असे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते. त्यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी खाऊन पिऊन थकले असतील, असा आरोप केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील संगमनेरमध्ये भाजप-शिवसेना युतीची प्रचारसभा झाली. या सभेत ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस थकले आहेत. कदाचित खाऊन खाऊन थकले असतील. काँग्रेस-राष्ट्रवादी इतकी थकले आहेत की, भविष्यात ते तुम्हाला एका व्यासपीठावर दिसतील.
निकालानंतर नगर जिल्ह्यात महायुती बारा-शून्य अशी परिस्थिती असेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही पराभवाची धूळ चारील. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जिल्ह्यात नामोनिशान मिटेल, असेही ठाकरे म्हणाले.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर