बाबरी मशीदीच्या उभारणीसाठी UP सरकारनं दिले ‘हे’ 5 पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार उत्तर प्रदेश सरकारने नवीन मशिदीच्या उभारणीसाठी मुस्लीम पक्षकारांना नवीन जागा देण्याचे निश्चित केले असून यासाठी पाच जागांची पाहणी देखील करण्यात आली आहे. मात्र, या जमिनी अयोध्या प्रदेशाच्या बाहेर आहेत. पंचकोशी परिक्रमा हा 15 किमीचा परिघ आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने पाहणी केलेल्या या पाचही जमिनी पंचकोशी परिक्रमेच्या बाहेर आहेत.

अयोध्या प्रशासनाने नवीन मशिदी उभारण्यासाठी मलिकपुरा मिर्झापूर, शमशुद्दीनपूर आणि चांदपूर या गावांची पाहणी केली, ज्या जमिनी अयोध्यापासून वेगवेगळ्या शहरांना जोडणार्‍या मुख्य रस्त्यावर आहेत. दरम्यान, सर्वांच्या संमतीनंतरच सरकार ही जमीन मुस्लीम पक्षकारांना देणार असल्याचे समजते आहे.

दरम्यान, अयोध्यातील वादग्रस्त जमीन हि रामलल्ला यांचीच असल्याने ती जमीन हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी, आणि मुस्लिम बांधवांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी ५ एकर जागा मिळणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला होता. त्यानंतर सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले होते. तर, नव्या मशिदीसाठी अयोध्येबाहेर सरकारच्या वतीनं पाच एकरची जागा देण्यात यावी असे सांगितले होते. मात्र, मुस्लिम बाजूने मशिदीसाठी जमीन घेण्याबाबत एकमत नव्हते. काही दिवसांपूर्वी अयोध्या प्रकरणाशी संबंधित पक्ष तसेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी संबंधित पक्षांनी पाच एकर जमीन नको, असे म्हंटले होते. मात्र, अयोध्या प्रकरणाशी संबंधित मुख्य पक्षाचा हाशिम अन्सारी यांचा मुलगा इक्बाल अन्सारी हे जमीन घेण्याच्या बाजूने उभे होते.

महत्वाचे म्हणजे, अयोध्यातील आतील भागाबाबत अजूनही वाद सुरुअसून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/