Narayan Rane | ‘राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा’, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार
सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) मंगळसूत्र बांधून एकत्र नांदले आणि नंतर शरद पवारांचा (Sharad Pawar) हात धरुन गेले. मुख्यमंत्री असताना देखील मातोश्री सोडली नाही. आता त्यांनी तिथेच आराम करावा आम्हाला नैतिकता शिकवू नये. त्यांनी राजीनामा देऊन मूर्खपणा केला आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाव काढू नका, डिप्रेशनमध्ये माणूस गेलाय, त्यांनीच शिवसेनेला संपवलंय, असा आरोप नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला.
सातारा येथे उद्योजक परिषदेच्या (Entrepreneurs Council) निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आले होते. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) हेही उपस्थित होते. या परिषदेनंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
नैतिकता असेल तर राजीनामा देऊन निवडणूक घ्यावी, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यावर नारायण राणे म्हणाले, त्यांना घरी बसवले आहे. त्यांनी तेथेच आराम करावा व मातोश्री चांगली ठेवावी. ते नावालाच मुख्यमंत्री होते. दोन तासच मंत्रालयात गेले. मातोश्री कधी सोडली नाही. राजीनामा देऊन मुर्खपणा केला. तसे आम्ही करणार नाही.
2024 ची निवडणूक (Election 2024) जवळच आली आहे. त्यावेळी काय ते बघूया.
दुसऱ्यांचा हात धरुन ते गेले तेव्हा त्यांच्याकडे नैतिकता किती आहे, हे दिसून आले,
असा टोला राणे यांनी लगावला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे राणे यांनी सांगितले.
Web Title :- you have done the foolish thing by resigning now rest in peace narayan rane attacked thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाकीत
Devendra Fadnavis | परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)