किरकोळ कारणावरून दुचाकी पेटवल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – किरकोळ वादातून दोन दुचाकी जाळल्याचा प्रकार आंबेगाव येथे जय भवानी चौकातील राधाकृष्ण कॉलनीमध्ये गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांना दोघांना अटक केली आहे.

राकेश प्रकाश लोखंडे व सयाजी बाबर अशी अटक करणयात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी चेतन निवृत्ती चांदेलकर ( २८ ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण कॉलनीतीलच शकील कुरेशी याच्यासोबत लोखंडे व बाबर या दोघांचे भांडण झाले होते. या त्याच्या रागातून दोघांनी बदला घेण्यासाठी राधाकृष्ण कॉलनीमध्ये पार्क केलेल्या दुचाकींवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. यात एक होंडा शाईन आणि स्प्लेंडर दुचाकी जळाली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दुचाकी पेटविणाऱ्या दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर करत आहेत.