मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्याच्या राजकीय घडमोडी अशा घडल्या की सत्तास्थापनेचे सर्वच फासे पलटले. आज सकाळी राजभवनावर जाऊन भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रमुख नेते अजित पवार यांनी सत्तास्थापन केली आणि राज्यातील सर्वांना मोठा धक्का दिला.
राजभवनावर जाऊन फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय बैठकीत घेण्यात येईल. अजित पवार यांच्याबाबत निर्णय निश्चित घ्यावा लागेल आणि घेतला जाईल असे शरद पवारांनी सांगितले.
NCP Chief Sharad Pawar: Ajit Pawar's decision is against the party line and is indiscipline . No NCP leader or worker is in favour of an NCP-BJP government pic.twitter.com/1AiEL4IUfC
— ANI (@ANI) November 23, 2019
शरद पवार म्हणाले की अजित पवार गेले याचं मला काही वाटत नाही, असा फुटीचा अनुभव मी घेता आहे. या फुटीतून मी गेलो आहे, ते गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. 1980 साली मला फुटीचा अनुभव आला, त्यानंतर आम्हाला सोडून जाणाऱ्या सर्वांचा मी पराभव केला आहे. फक्त असं कधी वाटलं नव्हतं की अजित पवार फुटून जातील.
सत्तास्थापनेचा दावा आम्ही करणार असे सांगताना पवार म्हणाले की, आम्ही सरकार बनवणार, बनवू शकतो आणि आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे. अजित पवार ईडीच्या चौकशीमुळे गेले की काय हे मला माहिती नाही. परंतू योग्य त्या कारवाईचा निर्णय बैठकीत घेऊ.
Sharad Pawar: Parties had their MLAs list signed by all MLAs, a similar list of NCP was with Ajit Pawar, as he is CLP of NCP. I assume that he has submitted the same list. I am not sure about this but I suspect that this may be the case. We will discuss with Governor pic.twitter.com/tNfCXbRKO6
— ANI (@ANI) November 23, 2019
राजभवनात सत्तास्थापनेचा भाजपकडून कसा दावा करण्यात आला यावर बोलताना पवारांनी खुलासा केला, ते म्हणाले याद्या तयार करुन आमदारांच्या सह्या घेऊन ठेवल्या होत्या. त्या याद्या अजित पवारांनी कार्यालयातून ताब्यात घेतल्या असतील. याच याद्या अजित पवारांनी राज्यपालांसमोर सादर केल्या असतील. हा फसवणूक करण्याचा प्रकार आहे. भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही.
Visit : Policenama.com
- सुगंधी तेलच्या मसाजने होतील ‘हे’ ८ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- थंडीत गरम कपडे परिधान कराच, अन्यथा बिघडू शकते आरोग्य, लक्षात ठेवा ४ गोष्टी
- आहारात ‘व्हिटॅमिन सी’ हवेच, अन्यथा होऊ शकतात ‘या’ ५ आरोग्य समस्या
- शारीरिक हालचाल आवश्यकच, अन्यथा शरीरात होतील ‘हे’ ८ बिघाड!
- थंडीमुळे ओठ पांढरे पडलेत, फाटलेत का? मग करा ‘हे’ ६ घरगुती उपाय
- ‘हे’ ५ व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक, कमतरतेमुळे होतात ‘या’ आरोग्य समस्या
- मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ नियमित करा