IPL 2020 : कोच संदीप चव्हाणांच्या सल्ल्यामुळेच ऋतुराज ठरला यशस्वी, सांगितलं होतं सलामीला खेळण्याबाबत

पुणे: पोलिसनामा ऑनलाइन – आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू असणाऱ्या महाराष्ट्राच्या ऋतुराजचे सर्वत्र कौतुक होत आहे. महेंद्रसिंग धोनीनेही त्याचे कौतुक केले आहे त्याने सलग तीनवेळा अर्धशतके ठोकून सलामीवीर ‘किताब मिळवला आहे. त्याच्या या यशामागे कोच संदीप चव्हाण यांनी त्याला सलामीला खेळण्याचा दिलेला सल्ला महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

संदीप चव्हाण म्हणाले, सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ऋतुराज १६वर्षांचा होता. वेंगसकर अकादमीमध्ये प्रशिक्षाणासाठी यायचा. हा खेळाडू महाराष्ट्र संघासाठी मधल्या फळीत फंलदाजी करायचा. क्लब सामन्यात त्याला मी दावाच प्रारंभ करण्याचा सल्ला दिला. यामुळे भविष्यात लाभ होईल याची खात्री दिली.

स्थानिक मांडके चषक स्पर्धेत सिनियर गटात डावाची सुरुवात करताना त्याने क्रमश १०० आणि ९० धाव काढून माझा निर्णय योग्य ठरवला होता.

राज्याचे प्रतिनिधित्त्व करताना सलामीला सुरुवातीला त्याला त्रास झाला, मात्र त्याने स्वतः ला लायक बनवले. आज तो तज्ज्ञ सलामीवीर बनला आहे.