मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या आठवडया पासुन राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शनिवारी (दि. 23) सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अवघ्या 80 तासाच्या आत सरकार कोसळलं आणि दोघांनी पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येणार हे निश्चत झालं.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व करण्यावर शिक्कामोर्तब झालं आणि उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री बनणार असल्याचे निश्चित झाले. उध्दव ठाकरे हे उद्या (गुरूवार) सायंकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, त्यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गृहमंत्री बनणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यापुर्वी देखील त्यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली होती.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोण-कोण मंत्री बनणार याबाबत तर्क-वितर्क मांडण्यात येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. त्यामध्ये अनेकांचा समावेश आहे. मात्र, राज्याच्या गृहमंत्री पदाची माळ ही राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याच गळयात पडणार असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोण-कोण मंत्री बनवणार हे आगामी काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय