अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे आपल्याला मंत्रिपद मिळते की नाही, या चिंतेत असलेले मावळते गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज रात्री शनि मूर्तीला अभिषेक घातला. रात्री उशिरा ते शनिशिंगणापूर येथे दाखल झाले होते.
सध्याची राजकीय परिस्थितीत सरकार कोणाचे बनते, हे निश्चित सांगता येणे कठीण झाले आहे. तसेच भाजपातूनही विखे-पाटील यांना मोठा विरोध होत आहे. जिल्हा भाजपात विखे-पाटील हे एकाकी पडले आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून काहीसे चिंतेत असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज रात्री शनिशिंगणापूरकडे धाव घेतली. त्यांनी शनीला अभिषेक घातला. त्यांनी शनि देवाकडे नेमकी काय याचना केली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा शनिशिंगणापूर येथे जाऊन शनि देवाचे दर्शन व शनि मूर्तीला घातलेला अभिषेक हा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
Visit : Policenama.com
- नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास