मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सातारा, सांगली शहरात पूरस्थिती उद्भवली. पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेल्या पोलीस राजाराम वाघमोडे यांना पाण्यात भिजून ताप आल्याने निमोनिया झाला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. पलूस येथे पूरग्रस्तांच्या मदतीला वाघमोडे हे आठवडाभर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे.
पुरामधून वाचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि एनडीआरएफ यांनी मोठे कार्य केले. रात्रंदिवस पाण्यामध्ये असल्यामुळे पुरग्रस्तांप्रमाणे पोलिसांचे हाल झाले. पूरग्रस्तांना मदत करत असताना पोलीस राजाराम वाघमोडे यांना पाण्यात भिजून ताप आल्याने निमोनिया झाला होता. ऑन ड्यूटी असताना त्यांना चक्कर आली. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. राजाराम पांडुरंग वाघमोडे हे गेल्या 25 वर्षांपासून पोलीस सेवेत कार्यरत होते.
कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. पूर ओसरल्यानंतर आता साथीच्या आजारांनाही सुरुवात झाली आहे.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा